औरंगाबादः राज्यातील शेतकर्यांचा सातबारा सरसकट कोरा करा, महापोर्टल आणि पवित्र पोर्टल रद्द करा, पोलीस भरती, शिक्षक भरती, एमपीएससीच्या जागा वाढवाव्यात आदी मागण्यांसाठी सोमवारी औरंगाबादेत शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. क्रांतीचौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत शेतकरी आणि युवकांच्या विवध प्रश्नांसाठी युवकांनी हा मोर्चा काढला होता. या मोर्चाचे नेतृत्व पूजा मोरे यांनी केले. या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टीही सहभागी झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या औरंगाबादेतील महाजनादेश यात्रेच्यावेळी पूजा मोरे यांना पोलिसांनी दिलेली वागणूक चुकीची आणि संताप आणणारी आहे. अशी दडपशाही आम्ही खपवून घेतली जाणार नाही, आमच्या लेकीबाळींकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा, असा इशारा राजू शेट्टी यांनी या मोर्चाच्या वेळी दिला.
सर्वात लोकप्रिय
व्हिडीओः स्कूलबसमध्ये घुसून गतीमंद मुलीची छेड काढून विनयभंग, गुंडाचे टोळके मोकाट!
औरंगाबादः वळदगाव परिसरातील स्वयंसिद्धा
संस्थेच्या गतीमंद मुलांच्या शाळेच्या स्कूलबसमध्ये घुसून काही टवाळखोरांनी एका अल्पवयीन
मुलीची छेड काढून विनयभंग केल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे....
व्हायरल व्हिडीओ: बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे खळबळ
औरंगाबादः पार्टी विथ डिफरन्स अशी शेखी मिरवणाऱ्या एका राजकीय पक्षाच्या बीड जिल्ह्यातील दोन लोकप्रतिनिधींचा अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे...
‘दिल्लीत प्रचाराला बोलावून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना वाटायला लावल्या चिठ्ठ्या!’
नवी दिल्लीः दिल्ली विधानसभेच्या निवडणूक प्रचारासाठी महाराष्ट्रातून दिल्लीत गेलेल्या
भाजप नेत्यांचे एकेक रंगतदार किस्से समोर येऊ लागले आहेत. महाराष्ट्र भाजपचे
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही प्रचारासाठी...
औरंगाबादेत कोरोनाच्या समूह संसर्गाला सुरूवात, आता कोणालाही लागण होण्याचा धोका!
औरंगाबादः औरंगाबादेत कोरोना विषाणूच्या समूह संसर्गाला सुरूवात झाली असून या पुढे सार्वजनिक आरोग्य उपाययोजना म्हणून लॉकडाऊनसारख्या उपाययोजनांचा फारसा उपयोग होणार नाही, असा...