मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १७ मार्च ते ३१ मार्च २०२० या कालावधीत नागरिकांसाठी राजभवन भेटीची योजना स्थगित करण्यात आली असल्याचे राजभवनातून जाहीर करण्यात आले.
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले. या कालावधीत ज्या लोकांनी राजभवन भेटीसाठी आरक्षण केले आहे, त्यांना कालांतराने राजभवनाला भेट देता येईल, व त्याप्रमाणे त्यांना स्वतंत्रपणे सूचित केले जाईल, असेही कळविण्यात आले आहे.